Subscribe Us

सावित्रीबाई फुले भाषण | savitribai phule bhashan 1

सावित्रीबाई फुले भाषण | savitribai phule bhashan 1


सावित्रीबाई फुले भाषण, savitribai phule bhashan 1

जिच्यामुळे महिला आज

समाजात सन्मानाने उभी आहे ,

ती ज्ञानज्योती महिला

भाग्यविधाता सावित्रीबाई

      भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणार्‍या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार अभिवादन.

हे पण वाचा ➡️ जिजाऊ जयंती भाषण

     आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजनवर्ग व माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो ,आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ! आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही विनंती !

महात्मा ज्योतीराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरु केली. परंतु मुलींना शिकवण्याचे धाडस कोणी करत नव्हते. तेव्हा सावित्रीबाई मुलींना शाळेत जावून शिकवत असत.

जिंदगी एक काटो का सफर है,

   जिंदगी एक काटो का सफर है,

     हौसला उसकी पहचान है !

       रास्तो पर तो सभी चलते है ,

          पर जो रास्ते बनाये वही इन्सान है !

पुण्यातले अति कर्मठ लोक त्यांच्यावर शेण, दगडफेक - चिखल फेकत असत.  परंतु सावित्रीबाई फुले यांनी या सर्व समस्यांना धीराने तोंड देत असत आणि त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले.

प्राचीन काळापासून समाजा मध्ये विविध प्रथा रूढ होत्या. जसे कि सती प्रथा, केशवपन, बाल विवाह,  या सर्व रूढी परंपरांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे त्यामुळे  या रूढी-परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असत. म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांवर होणाऱ्या क्रूर प्रथांना नेहमीच विरोध केला. बाल जठार या परंपरेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत.

हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती Youtube वरील भाषण

तसेच त्या काळी पुनर्विवाह यास मान्यता नव्हती त्यामुळे ज्या मुली सती जात नसत त्यांचे केशवपन करून त्यांना खूप कुरूप बनवले जात असे.

महात्मा फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतीराव फुले यांना सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहकार्य केले.

सन 1875 -77  मध्ये पडलेल्या दुष्काळात त्या दुष्काळ ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्रे चालवली. समाज - जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली. तसेच सावित्रीबाई यांनी काव्यफुले आणि बावनकशी के काव्यसंग्रह लिहिले.

सन 1896 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरु करून रोग्यांची त्या सेवा करू लागल्या.

परंतु सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेग ची लागण झाली आणि 10 मार्च 1897 ला सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

शेवटी जाता जाता एवढंच बोलेल .....

  स्त्रियांच्या अंधार्‍या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती

    म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री !

जय हिंद जय महाराष्ट्र !

हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा

वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी

हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list

हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी

येथे क्लिक करा.▶️ शिक्षक बदली वेबसाईट

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇













Post a Comment

0 Comments