महाराष्ट्र दिन निबंध | maharashtra din nibandh
![]() |
महाराष्ट्र दिन निबंध | maharashtra din nibandh |
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.
१ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा या महाराष्ट्राच्या मातीत आणि संत, कलावंत, साहित्यिक, कलाकार, गायक, वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले. असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. ही आहे आपल्या महाराष्ट्राची शान. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्या दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात .
वाचा👉 महाराष्ट्र दिन भाषण
भारत हा एक गणतंत्र देश असून ह्यामध्ये अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. भारतामध्ये एकूण २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. आणि महाराष्ट्र त्याच २९ राज्यांपैकी एक. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. म्हणूनच ह्या दिवसांनी महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये महाराष्ट्र स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस शाळा, महाविद्यालये, आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी साजरा केला जातो. ह्या दिवशी शाळा, कॉलेज,आणि शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळांमध्ये विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात. निबंध लेखन, वक्तृत्व भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, परिच्छेद लेखन, वादविवाद स्पर्धा, एकांकिका, पथनाट्य, पोवाडागायन,अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यामध्ये विद्यार्थीही अतिशय आवडीने सहभागी होतात. ह्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि आपल्या संस्कृतीबद्दल सखोल माहिती मिळावी असा हेतू असतो.
वाचा👉महाराष्ट्राचा राज्य माहिती मराठी
महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले.
0 Comments